मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. 17 ते 25 ऑगस्टपर्यंत राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालणार आहे. मात्र त्यापुर्वीच विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्वीटमुळे वातारवण तापलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पावसाळी अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. दरम्यान विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.