चिपळूण शहरातील पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. चिपळूण शहरातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणमध्ये अनेक लोक पुरात अडकेलेले आहेत. चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी भरतीची स्थिती त्यामुळे चिपळूणमध्ये 2005 पेभा भयानक स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुराच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. सध्या बोटींच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून हे बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.