नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढणार. विधानसभा निवडणुकांना तीन वर्षाचा वेळ आहे, त्यांचा निर्णय नंतर होईल. मंत्रीमंडळ बदलाबाबत कुठलीही चर्चा राहुल गांधींसोबत झालेली नाही. महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या संघटनेबाबत चर्चा झाली. अॅक्शन प्लान बनवून काँग्रेस महाराष्ट्रात उभी राहणार. महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे स्थिर राहणार आहे. कुणाही विषयी वैयक्तिक टीका मी केलेली नाही, मुख्यमंत्र्यांबाबत तर नाहीच नाही.