रत्नागिरी : विरोधकांकडे वेळ भरपूर आहे म्हणून ते मोठा दौरा करतायत. मुख्यमंत्र्यांवर मोठी जबाबदारी आहे ते आढावा घेऊन मदतीची घोषणा करणार आहेत. विरोधकांना आरोप करण्यपलीकडे काहीही काम नाही. मुख्यमंत्र्यांनी आज रत्नागिरीत आढावा बैठक घेतली ज्यामध्ये जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडून संपूर्ण माहिती घेतली सिंधुदुर्ग दौऱ्यात ते अनेक ठिकाणी भेट देतायत आणि दोन दिवसात मदतीची घोषणा केली जाईल. कोकणवासीयांची काळजी घेण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम आहे.