मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा धोका वाढला आहे. काळजी घ्या मास्क वापरा असं अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी कचरा प्रश्नावरून पुणेकरांना देखील इशारा दिला आहे. रस्त्यावर कचरा टाकल्यास कठोर कारवाई करू असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.