कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपलंय. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांनी खर्च केलेले लाखो रुपये मातीत गेले. कोल्हापुरातील अनेक पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर पहायला मिळतोय. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.