एकादशीचा रथोत्सव 10 वारकरी, मंदिर समितीच्या 5 सदस्यांच्या उपस्थित करावा, असं महत्त्वाचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची काल बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना बसमधून जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं पवार म्हणाले. | Ajit pawar Press Conference Ashadhi Wari