Special Report: एकनाथ शिंदे नाही तर उद्धव ठाकरेच… दिपक केसरकर यांचे खळबळजनक गौप्यस्फोट

| Updated on: Aug 05, 2022 | 11:10 PM

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतल्यानंही उद्धव ठाकरे नाराज झाले होते..तसंच सुशांत सिंह प्रकरणावरुन राणेंनी आदित्य ठाकरेंवर जे गंभीर आरोप केले होते, त्याची तक्रारही मोदींकडे करण्यात आली होती, असा दावाही केसरकरांचा आहे.

Follow us on

मुंबई : शिंदे गटाचे आमदार, दिपक केसरकरांनी(Deepak Kesarkar) मोठा गौप्यस्फोट केला आहे.  गेल्या वर्षी उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना(PM Modi) भेटले आणि त्या भेटीनंतर 15 दिवसांत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) राजीनामा देणार होते. युतीसाठी बोलणीही झाली होती, असा दावा केसरकरांनी केला आहे.
मोदींना भेटल्यानंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते. मात्र त्याचवेळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झालं. त्यामुळं पुढची बोलणी फिस्कटली, असा गौप्यस्फोटही केसरकरांनी केला आहे. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतल्यानंही उद्धव ठाकरे नाराज झाले होते..तसंच सुशांत सिंह प्रकरणावरुन राणेंनी आदित्य ठाकरेंवर जे गंभीर आरोप केले होते, त्याची तक्रारही मोदींकडे करण्यात आली होती, असा दावाही केसरकरांचा आहे.
गेल्या वर्षी 26 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन राणेंनी, आदित्य ठाकरेही कोठडीत जाईल. उद्धव ठाकरे स्वत: मुलाला वाचवण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा गंभीर आरोप राणेंनी केला होता. केसरकरांनी एकाच पत्रकार परिषदेत गौप्यस्फोटांची मालिकाच लावली. शिंदेंसोबत आमदारांनी बंड पुकारल्यावरही, उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. मात्र शिंदेंनाच वेगळं करा मग भाजपसोबत युती करतो, असं ठाकरे म्हणाले होते असं केसरकर म्हणतायत. केसरकर जे दावा करत आहेत, असाच दावा गेल्याच महिन्यात खासदार राहुल शेवाळेंनी केला होता. मात्र जे दावे शेवाळे आणि आता केसरकरांकडून झालेत, ते शिवसेनेनं फेटाळलेत.