राज्यात जोरदार सत्तासंघर्ष बघायला मिळतोयं. बहुमत सिध्द करण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांची ताकद पणाला लागणार आहे. त्याचपार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांना थेट राज ठाकरे यांना फोन करून बहुमतासाठी मदत करण्याची विनंती केल्याची माहिती मिळते आहे. शिवसेनेतील आमदांरांची बंडखोरी आणि भाजपने टाकलेला डाव या स्थितीत बहुमत चाचणी झाल्यास महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची दाट शक्यता आहे. मात्र बंडखोर आमदारांपैकी काहींची मनं अजूनही बदलू शकतात, अशी एकमेव आशा शिवसेनेला आहे. त्यामुळेच आमदारांच्या अपात्रतेसंबंधी कारवाईची प्रलंबित याचिका असताना राज्यपाल एवढ्या तडकाफडकी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश कसे देऊ शकतात, हे कारण घेऊन शिवसेना कोर्टात पोहोचली आहे.