Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच…

Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच…

| Updated on: Jul 25, 2026 | 2:50 PM

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस आंदोलन सुरू होते. या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या कार्यकाळातील भूमिका स्पष्ट केली आहे.

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस आंदोलन सुरू होते. या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या कार्यकाळातील भूमिका स्पष्ट केली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रात म्हटले की, 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडणे ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता होती. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्याने 21 जून 2026 रोजी फेरपरीक्षा यशस्वीपणे घेण्यात आली.

तसेच 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालात गरीब आणि वंचित कुटुंबांतील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना यश मिळाले, असे त्यांनी नमूद केले. मात्र, काही जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना मोठे दुःख झाल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर या प्रकरणाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या पत्रातील विधानांमुळे आता या संपूर्ण प्रकरणावर पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे विद्यार्थी, पालक आणि देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 25, 2026 2:50 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us