मुंबई : फडणवीस (Fadanvis) हे मॅच्युर्ड राजकारणी आहे, चुकीची स्टेटमेन्ट थांबली पाहिजेत, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी यावेळी केलंय. फोन लाईनवरुन टीव्ही 9 मराठीने दीपक केसरकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्रीपद त्याग करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपच्या गोटात एकच जल्लोष करण्यात आला. तसंच भाजपच्या नेत्यांनी वक्तव्य करताना संयम बाळगला पाहिजे, असंही ते म्हणालेत. दरम्यान हाती आलेल्या बातमीनुसार गोव्यात (Goa) शिंदे गटाची बैठक झाल्यानंतर शिंदे गट (Shinde Group) मुंबईत दाखल होणार आहे.