Ratnagiri | परतीसाठी रत्नगिरीतील चाकरमान्यांची एसटीलाच पसंती, जाईल तर एसटीनेच..

| Updated on: Sep 07, 2022 | 3:44 PM

Ratnagiri | रत्नागिरीतील चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसला पसंती दिली आहे.

Follow us on

Ratnagiri | रत्नागिरीतील (Ratnagiri)चाकरमान्यांनी (employees) परतीच्या प्रवासासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसला(ST) पसंती दिली आहे. जाईल तर एसटीनेच असा खास आग्रह कोकणवासीयांनी धरला होता. रेल्वेनंतर प्रवाशांनी एसटी महामंडळाला सर्वाधिक पसंती दिली. गणेशोत्सव (Ganeshostav)आणि गौरी गणपतीसाठी मुंबईतील चाकरमान्यांनी गावाचा रस्ता धरला होता. गौरी सण झाला असून दीड आण पाच दिवसांनी भक्तांनी गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला आहे. आता पुन्हा मुंबईत येण्यासाठी चारमान्यांनी एसटी महामंडलाच पसंती दिली आहे. रत्नागिरीतील तब्बल 130 बसेस चाकरमान्यांनी आरक्षित केल्या आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव आणि गौरी सणाची दणक्यात सुरुवात झाली. निर्बंध हटल्याने मोठ्या प्रमाणावर चाकरमान्यांनी कुटुंब कबिल्यासह गाव जवळ केला.