मुंबई : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर टोकाची टीका केल्यानंतरही मनसे कार्यकर्ते शांत आहेत. राज ठाकरेंनीच काही न बोलण्याचे आदेश दिलेत अशी वसंत मोरे यांची एक क्लिप व्हायरल झाली होती. मात्र वसंत मोरे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. एका जालन्याच्या कार्यकर्त्यांनी फोन रेकॉर्ड केला अन् त्यानेच वायरल केले आहे. अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरेंनी प्रवक्ते दिलेत तेच बोलतील. एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे. माझे उद्दिष्ट पक्ष वाढवणे, काम करणे आणि नगरसेवक वाढवणे हेच असल्याचे वसंत मोरे म्हणाले आहेत.