दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. वसमतमध्ये शेती पाहणी करत असताना शेतकऱ्यांनी त्यांना काजू आणि बदाम दिले. नांदेडमधील विभागीय दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम ठेवल्याच्या वादामुळे हा निषेध करण्यात आला, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काजू-बदाम देत आपला निषेध व्यक्त केला. वसमत येथील शेती पाहणी दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी त्यांना हे काजू आणि बदाम दिले. काही दिवसांपूर्वी नांदेड येथे मराठवाडा विभागीय दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम ठेवल्यामुळे वाद निर्माण झाला होता. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले. या घटनेवर बोलताना भरणेंनी नांदेडमधील वादावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, त्यांच्यासमोर काजू-बदाम नव्हते, मात्र चार तास चाललेल्या बैठकीत अधिकारी वर्गापैकी कोणाला तरी शुगर किंवा तत्सम आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी ते घेतले असावेत.
मात्र, हे चुकीचे होते, अशी कबुलीही त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी भरणेंना सांगितले की, “साहेब, परिस्थिती बिकट आहे. शेतकऱ्याचे फेरच बांधावर पोहोचतो तुम्ही. बांधावर आल्याने गांभीर्य कळते, त्यामुळे शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करणे ही आपली जबाबदारी आहे.” या निषेधातून शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती आणि आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
