मोठ्या थाटामाटात जल्लोषात साजरी केल्या जाणाऱ्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, या अभंगाप्रमाणे पंढरपुरातील विठूरायाचे रुप आज खुलून निघालं आहे.आषाढी एकादशी हा सण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी लाखो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपुरात दाखल होतात. आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी पर्वणी असते. या सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात. आषाढीला ‘देवशयनी एकादशी’ असं ही म्हणतात. आषाढ महिन्यात उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरु होतं. या काळात असूर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देतात. असूर शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी देवांची पूजा केली जाते.