सांगली : राष्ट्रवादी हा पक्ष नसून ती टोळी आहे. अजेंडा नसलेली राष्ट्रवादी फक्त फुटणार नाहीतर एक दिवस हा पक्ष पूर्णपणे संपणार आहे, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अजित पवार यांनी बारामतीमधील 44 गावांना वंचित ठेवलं आहे. जरी ते एक लाख मतांनी निवडून आले असले तरी त्यांनी एक लाख टक्के बारामतीच्या लोकांना त्यांनी फसवलं आहे, असं पडळकर म्हणालेत.