Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून जनजीवनावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असला तरी अनेक भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून जनजीवनावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असला तरी अनेक भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.
काल दुपारनंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र, आज पहाटेपासूनच पावसाने पुन्हा जोर धरला असून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये दमदार सरी बरसत आहेत. विशेषतः तळ कोकण पट्ट्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवत आहे.
रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि चिपळूण या भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि सततच्या सरींमुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांतील पर्जन्यमानाचा विचार करता, रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 28 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक 43 मिमी पाऊस काही भागांमध्ये नोंदविण्यात आला आहे. यामुळे नद्या, ओढे आणि खाड्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, किनारपट्टी भागातही पावसाचा जोर कायम असून समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पुढील काही तास जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
