अमरावती : जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी वादळीवाऱ्यासह जिल्ह्यात गारपीट झाली. या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीसाठी आलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षभर राज्यात पाऊस पडत असून, खरीप हंगाममध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. तर आता अवकाळी पावसामुळे हातचे पिक गेले आहे. शेतकऱ्यांकडून नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याची मागणी करण्यात येत आहे.