कोल्हापूरमधील कोरोना संसर्गाची काय कारणं आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गृह विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याची गरज आहे. तिसऱ्या लाटेची तयारी केली आहे. टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं पाहिजे, टेस्टिंग वाढवल्यावर रुग्ण संख्या वाढलेली दिसेल, पण हरकत नाही, मात्र त्यामुळे ट्रेसिंग होऊन उपचार करणं सोपं होईल, असं अजित पवार म्हणाले.
खाजगी हॉस्पिटल्सनी चुकीची बिलं लावू नयेत. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही. पण बिलांवरुन तफावत नको, असं त्यांनी सांगितलं.