Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, NDRF टीम दाखल, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, NDRF टीम दाखल, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

| Updated on: Jun 15, 2025 | 5:13 PM

Indrayani River Bridge Rescue Operation : पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू झालं आहे.

कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम याठिकाणी दाखल झालेली आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 पर्यटक नागरिक वाहून गेलेले आहेत. तर 6 पर्यटकांनी आपला जीव गमावला आहे. वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र आता बचावकार्य लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने अगदी काही वेळातच अंधार पडणार आहे. अंधार पडल्यावर एनडीआरएफच्या टीमला बचाव कार्य थांबवावं लागू शकत. अंधारात वाहून गेलेल्या पर्यटकांना शोधणं एनडीआरएफच्या टीमला अवघड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झालेलं आहे. मात्र वाहून गेलेल्या पर्यटकांची संख्या देखील मोठी असल्याने त्यांना शोधण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. दरम्यान, इंद्रायणी नदीचा हा परिसर खडकाळ असल्याने वाहून गेलेले पर्यटक हे खडकांच्या आत देखील अडकून पडलेले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Published on: Jun 15, 2025 05:13 PM