AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! जलसमाधी आंदोलन करताना वाहून गेला अन् 40 तासांनी…

बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलनादरम्यान बेपत्ता झालेल्या विनोद पवार यांचा मृतदेह 40 तासांनंतर सापडला.

धक्कादायक! जलसमाधी आंदोलन करताना वाहून गेला अन् 40 तासांनी...
| Updated on: Aug 17, 2025 | 11:32 AM
Share

बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलनादरम्यान बेपत्ता झालेल्या विनोद पवार यांचा मृतदेह तब्बल 40 तासांनंतर शोध आणि बचाव पथकाला सापडला. शनिवारी, 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास, आंदोलन स्थळापासून 14 किलोमीटर अंतरावर धुपेश्वरजवळ पूर्णा नदीच्या गाळात पवार यांचा मृतदेह आढळला.

15 ऑगस्ट रोजी, जिगाव प्रकल्पानजीक आडोळ खुर्द येथे गावकऱ्यांनी पुनर्वसन आणि रस्त्यांच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाविरुद्ध प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन केले होते. आडोळ खुर्द गावाचा जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समावेश असूनही, गावकऱ्यांना अद्याप जमीन आणि योग्य मोबदल्याचा प्रश्न सुटलेला नाही. या आंदोलनादरम्यान विनोद पवार यांनी पूर्णा नदीत उडी घेतली, परंतु नदीचा वेगवान प्रवाह आणि दुथडी भरलेले पाणी यामुळे ते वाहून गेले. या घटनेने गावकरी, पोलीस आणि प्रशासनात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच बुलढाणा येथील शोध आणि बचाव पथक तातडीने आडोळ खुर्द येथे रवाना झाले. शुक्रवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती, परंतु अंधारामुळे ती थांबवावी लागली. शनिवारी सकाळी अकोला आणि नांदुरा येथील पथकांनी पुन्हा शोध सुरू केला. अखेर सामूहिक प्रयत्नांनंतर पवार यांचा मृतदेह सापडला.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आंदोलकांनी या संपूर्ण प्रकरणाला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, विनोद पवार यांच्या कुटुंबाला अद्याप प्रशासनाकडून कोणतीही तातडीची आर्थिक मदत मिळालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.