Jayant Patil : …आता मंत्र्यांनी तातडीनं कामाला लागावं, विरोधक म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडूच : जयंत पाटील

Jayant Patil : …आता मंत्र्यांनी तातडीनं कामाला लागावं, विरोधक म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडूच : जयंत पाटील

Pradeep Garad | Updated on: Aug 09, 2022 | 4:53 PM

संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना आधी खाली खेचायचं आणि मग स्वत:च्या बाजूला बसवायचं हा विरोधाभास भाजपाच (BJP) करू शकतं, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

मुंबई : अखेर 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. राज्यातील मातीत गोगलगायींचा विस्तार झाला, शेतकरी हवालदील आहे. आता मंत्र्यांनी तातडीनं कामाला लागावं, असा टोला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर लगावला आहे. त्याचबरोबर महिलांना स्थान न देणं हे बाहेरुन दिसू शकतं पण कुणाला स्थान द्यायचं, कुणाला द्यायचं नाही हे मुख्यमंत्री आणि सहकारी ठरवत असतात. या मंत्रिमंडळानं (Cabinet) उत्तम काम करावं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडूच, असा सूचक इशाराही जयंत पाटील यांनी दिलाय. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना आधी खाली खेचायचं आणि मग स्वत:च्या बाजूला बसवायचं हा विरोधाभास भाजपाच (BJP) करू शकतं, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे.

Published on: Aug 09, 2022 4:53 PM
Follow Us