राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 2019 चा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असल्याचा माझा कयास आहे.त्या घटनेमुळे राष्ट्रपती राजवट जाऊन नवं सरकार सहज स्थापन झालं. शरद पवारांनी केलेल्या गोष्टींचा अर्थ कळायला वेळ जावा लागतो, असं जयंत पाटील म्हणाले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.