छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदेशीच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचा जो मुद्दा राज ठाकरे यांनी हात घेतल्यामुळे माझं राज ठाकरे यांना जाहीर समर्थन असल्याचे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले. भाषावाद, जातीयवाद केल्यामुळे आणि प्रांतवाद केल्यामुळे काहींची मने दुखावली आहेत, मात्र ही स्थितीही लवकरच निवळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इंग्रजांनी राष्ट्रद्रोहाचा कायदा बनवला होता आणि सुप्रीम कोर्टाने आता सांगितलं नाही राष्ट्रद्रोहाचा कायदाच खतम करा त्यामुळे खरी अभिव्यक्तीची स्वातंत्र पायदळी तुडविला जात असल्याचेही कालीचरण महाराज यांनी सांगितले.