बदलापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठं विधान केलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे केवळ दोन महिन्यांचे पाहुणे आहेत. त्यांची मंत्रिमंडळातील गच्छंती अटळ आहे, असे विधान किरीट सोमय्या यांनी केले आहे. तसेच अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. परब यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप आहेत, असा दावासुद्धा त्यांनी केला.