कोकणात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची रत्नागिरीसह दापोलीत सभा पार पडली. यावेळी यावेळी शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी भास्कर जाधव यांनी जर गद्दार कोण असेल तर तो रामदास कदम असेल असे म्हटलं होतं. त्यानंतर आता रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तसेच आपण आदित्य ठाकरे यांचे दापोली येथील भाषण ऐकली. तर त्यांच्या बरोबर आलेल्या एका सोंगाड्या व्यक्तिचेही भाषण ऐकल्याचे ते म्हणाले. तो व्यक्ति म्हणजे भास्कर जाधव असे ते म्हणाले. तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना, खोक्याचा राजकारण फक्त आमदारांना बदनाम करण्यासाठीच असल्याचेही कदम म्हणाले.