दादा भुसे यांना कमी महत्त्वाचं खातं दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा आता राज्यात रंगू लागलीयं. विशेष म्हणजे आता याविषयावर स्वत: दादा भुसेंनी आपली प्रतिक्रिया दिलायं. माझी तब्येत बरी नसते. प्रवास करणे जमत नाही. प्रवासामुळे मला शारिरीक त्रास होता. मी गेल्या वर्षभरापासून खातं बदलून देण्याची मागणी केली होती. मागच्या सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आताच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दुसरी जबाबदारी देण्याची मागणी केली होती. कोणतीही जबाबदारी आपल्याला विश्वासाने दिली जाते त्या जबाबदारीला न्याय दिला पाहिजे, असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मी खाते वाटपासंदर्भात नाराज वगैरे अजिबात नाहीयं