MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 15 October 2021

| Updated on: Oct 15, 2021 | 8:44 AM

जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलं होतं. तसेच अटक करुन ठाणे पोलिसांनी आव्हाड यांना कोर्टासमोरदेखील हजर केलं होतं. या प्रकरणात कोर्टाने त्यांना तत्काळ जमीनदेखील दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अतिशय गुप्त ठेवण्यात  आली होती.

Follow us on

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक (Jitendra Awhad Arrested) करुन जामिनावर सोडण्यात आलं. कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. अनंत करमुसे या व्यक्तीचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच गुन्ह्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. ठाणे पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिलीय.

जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलं होतं. तसेच अटक करुन ठाणे पोलिसांनी आव्हाड यांना कोर्टासमोरदेखील हजर केलं होतं. या प्रकरणात कोर्टाने त्यांना तत्काळ जमीनदेखील दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अतिशय गुप्त ठेवण्यात  आली होती.

जितेंद्र आव्हाड यांची अटक आणि जामीन ही घडामोड माहीत झाल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी तसेच आव्हाड यांना लक्ष्य केल. अनंत करमुसे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं. त्यांना कशाप्रकारे मारहाण करण्यात आली ये सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती. मात्र, त्यांचच सरकार असल्यामुळे त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नसेल. मात्र आता कोर्टाच्या काही अडचणी अल्या असतील. तसेच इतर संभाव्य अडचणी आल्या असतील त्यामुळे ऑनरेकॉर्ड अटक दाखवली असेल. पण सरकार यांचच असल्याेमुळे जामिनाची व्यवस्था करुन ठेवली असेल, असा दावा प्रविण दरेकर यांनी केला.