MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 29 July 2021

| Updated on: Jul 29, 2021 | 8:33 AM

राज्यातील 14 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध हटवण्याची तयारी राज्य सरकारने सुरु केली आहे. यासंदर्भात लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. तर बीड जिल्ह्यात (Beed corona) कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

Follow us on

राज्यातील 14 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध हटवण्याची तयारी राज्य सरकारने सुरु केली आहे. यासंदर्भात लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. बीड जिल्ह्यात (Beed corona) कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. आष्टी, पाटोदा, शिरुर, गेवराई या चार तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यापूर्वीच यातील काही तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. (corona positivity rate increased, new restrictions in four talukas Ashti, Patoda, Shirur and Georai  of Beed district Maharashtra)

बुधवारी 28 जुलैला नव्याने काढण्यात आलेल्या आदेशात आष्टी, पाटोदा, शिरुर आणि गेवराई या चार तालुक्यात सकाळी 7 ते दुपारी 12.30 पर्यंत मार्केट सुरु ठेवता येणार आहे. यानंतर फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. यासह शनिवार आणि रविवार हे दोन दिवस विकेंड लॉकडाऊन असेल. कडक निर्बंध काळात नियम डावलणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.