मुंबई : गेले दीड वर्ष बंद असलेली राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरु होणार आहेत. मर्यादित उपस्थिती, लसवंतांनाच प्रवेश हे नियम लागू राहतील. मात्र, सध्या ऑनलाईन सत्र परीक्षा सुरू असल्याने अनेक महाविद्यालयांनी दिवाळीनंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या संकुलातील गजबज दिवाळीनंतरच वाढण्याची शक्यता आहे. तर, काही महाविद्यालयं सुरु करण्यात आली आहेत. महाविद्यालयांमध्ये पेढे खाऊ घालून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.