मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. फडणवीसांच्या पेटाऱ्यातून काय बाहेर येतं? राज्यासाठी कोणत्या तरतुदी केल्या जातात? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. कोणत्या विभागाला काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार का? त्याबाबत काही तरतूद केली जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.