मुंबई: “राज्याच्या प्रमुखाने राज्यातल्या जनतेकडे समन्यायाने बघायच असतं. परंतु जनतेला सुद्धा आता पश्चाताप झाला आहे. ज्यांना झाला नव्हता, त्यांनाही आता पश्चाताप होईल, कोणती चुकीची लोक सत्तेवर आली आहे. जी माणसं राजकारण बघून पाठबळ, पाठिंबा बघून लोकांना मदत करतात. असं जर मदत करत असतील, तर बंडूशेठ जाधव, शिवसेना स्थानिक लोकांना न्याय मिळवून देतील” असं आमदार भास्कर जाधव म्हणाले.