अयोध्या दौऱ्याला (Ayodhya tour) विरोधाचा ट्रॅप होता, असे सांगत राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी अयोध्या वारी न केल्याचे कारण दिले असले तरी यानिमित्ताने त्यांनी केलेल्या काही विधानाने ते भाजपावर (BJP)नाराज तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे. उ. प्रदेशातला एक खासदार उठतो आणि उ. प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का. या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगताही येणार नाहीत. असे ते म्हणाले. यावरुन त्यांची अयोध्या दौऱ्याला झालेल्या विरोधावरुन भाजपावर नाराजी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.