Monsoon Arrives : राज्यासाठी आनंदाची बातमी! मान्सून तब्बल 12 दिवस आधीच धडकला
Monsoon arrives early in Maharashtra : राज्यात मान्सून यंदा वेळेच्या आधीच दाखल झालेला असल्याने संपूर्ण राज्यासाठी आणि बळीराजासाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. मान्सून तळकोकणातील देवगडमध्ये दाखल तब्बल 12 दिवस आधीच दाखल झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण 7 जूनला मान्सून दाखल होतो. मात्र यंदा वेळेच्या आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, मुंबईतही लवकरच मान्सून दाखल होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
नैऋत्य मान्सूनने भारतात एण्ट्री केली असून केरळ, कर्नाटकचा बहुतांश भाग, संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रातील तळकोकण व्यापला आहे. तळकोकणातील देवगडमध्ये मान्सून दाखल झाला असून पुढचे पाच दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता मुंबईतील प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढच्या पाच दिवसांसाठी कोल्हापूर, कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
