सध्या मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. मान्सूच्या महाराष्ट्र प्रवेशास विलंब झाल्याने शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान मान्सून संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सूनला विलंब झाला असतानाच राज्यात पुन्हा एकदा उन्हाचा कडाका देखील वाढला आहे.