मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चानंतर राज्य सरकारने चर्चेचं आमंत्रण दिलं आहे. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समन्वयकांसोबत भेटणार असल्याचं सांगितलं. चर्चा सकारात्मक होईल असा विश्वास संभाजीराजेंनी वर्तवला. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटणार असलो तरी य़ाधीच महत्त्वाच्या 5 मागण्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं संभाजीराजेनी सांगितलं.