नवाब मलिक यांना पाठिशी घालणार असेल तर, ठाकरे सरकार हे दाऊद इब्राहिम समर्पित सरकार- फडणवीस

| Updated on: Mar 03, 2022 | 2:00 PM

महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन (Budget Session) आजपासून सुरू झालं आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे.

Follow us on

महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन (Budget Session) आजपासून सुरू झालं आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे. भाजपानं आक्रमक भूमिका घेतली असून नवाब मलिक हाय हायच्या घोषणा तर भाजपानं दिल्याच. त्याचबरोबर जुते मारो सालों को, अशी आक्षेपार्ह घोषणाबाजीही भाजपाच्या आमदारांनी केलीय. भाजपा नेत्यांच्या या आंदोलनात काही वेळानंतर विधान सभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसदेखील (Devendra Fadanvis) सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपाच्या नेत्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जर असते तर एका मिनिटांत त्यांना काढून टाकलं असतं. कारण मुंबईसोबत त्यांनी गद्दारी केली आहे. ते मुंबईचे अपराधी आहेत. ज्यांनी मुंबई बॉम्बस्फोट घडला त्यांच्याकडून फक्त जमीनच नाही घेतली, तर 50 लाख रुपये हसीना पारकरला दिला. दाऊदच्या बहिणीला पैसे देणं याचा अर्थ काय? अध्यक्ष महोदय या ठिकाणी आमची मागणी आहे, की दाऊदला समर्थन देणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.