मागच्या दीड महिन्यापासून नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. आज 36 दिवसांनतर राणा दाम्पत्य अमरावतीत दाखल झालं तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तेव्हा या दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दात टीका केली.”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी आहे, हे संकट दूर व्हावं म्हणून आम्ही हनुमानाचरणी प्रार्थना करतोय”, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत. खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दात टीका केली.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी आहे, हे संकट दूर व्हावं म्हणून आम्ही हनुमानाचरणी प्रार्थना करतोय”, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.