पुणे : ‘Why I killed Gandhi’ या चित्रपटामुळे सध्या महाराष्ट्राचं सामाजिक-राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कुणी अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेच्या (nathuram godadse) केलेल्या भूमिकेचं समर्थन करतंय तर कुणी त्यांनी ही भूमिका करायला नको होती, असं म्हणतंय. अशात अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) यांनी राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (dr. amol kolhe) यांना पाठिंबा दिला आहे. ‘अमोल कोल्हे यांनी अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन केलं असं होत नाही’, असं नाना पाटेकर म्हणालेत. नाना पाटेकर आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. आताही Why I killed Gandhi या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर नाना पटेकरांनी आपलं मत मांडलं आहे. ‘मीही ‘लास्ट व्हाईस रॉय माउंट बॅटन’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. अमोल कोल्हे यांनी केवळ अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन केलं, असं होत नाही’, नाना पाटेकर म्हणालेत. ‘तसंच कुणी कोणती भूमिका करावी हा त्यांचा प्रश्न आहे. यापेक्षा महत्वाचे विषय सध्या समाजात आहेत. त्यावर बोलणं गरजेचं आहे’, असं नाना पाटेकर म्हणालेत.