केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणी करण्यात येणाऱ्या आरोपांना नारायण राणे यांनी उत्तर दिलंय. शशिकांत वारीसे या पञकाराला मी कधी भेटलो नाही. तो मला माहितही नाही. चौकशीत जे समोर येईल ते येऊ द्या, असं नारायण राणे म्हणालेत. शिवाय विनायक राऊत ही कोकणाला लागलेली किड आहे. संजय राऊतांची मी दखल घेत नाही, असा घणाघातही त्यांनी केलाय.