अमरावती : महाराष्ट्रवरील संकट दूर व्हावं, यासाठी मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचणार असल्याची मी फक्त घोषणा केली होती. जेव्हा मला 14 दिवस जेलमध्ये टाकले. तेव्हाच मी निर्णय घेतला की जिथे जिथे हनुमान आणि रामाला विरोध होईल तिथे तिथे मी डोक्यावर भगवा बांधून सर्वात आधी त्यांच्या समोर उभी राहील. आज राज्यात जे सरकार आहे. ते हिंदूत्ववादी विचारावर चालणारं आहे, असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. त्या अमरावतीत बोलत होत्या.