मुंबई : राज्यात काही भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने निर्बंधामध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. सरकारने राज्यातील अकरा जिल्ह्यांचा समावेश लेव्हल तीनमध्ये केला आहे. तर बाकीच्या 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहे. ज्या 25 जिल्ह्यांत निर्बंध शिथील करण्यात आले आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवता येतील. तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी दुपारी दुकाने चार वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी असेल. जाणून घ्या सरकारने काय सूट दिली आहे.