तर ठाकरे सरकारने दाऊदला महाराष्ट्र भूषण द्यावा- नितेश राणे

| Updated on: Mar 13, 2022 | 2:04 PM

आम्ही हिंदूची बाजू घेतली आहे, तसेच चुकीचं काही बोलेलो नाही. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही, सकाळी आमच्या विरोधात तक्रार झाल्याचे समजले आहे. योग्यवेळ आल्यावर त्यावर बोलेन असं नितेश राणे (nitesh rane) यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. तसेच महाविकास आघाडीसरकारला दाऊदचा इतका पुळका आहे तर त्यांनी दाऊदला महाराष्ट्र भूषण देऊन टाका. त्याचबरोबर आम्ही काहीही चुकीचं बोललेलो नाही अनिल देशमुख […]

Follow us on

आम्ही हिंदूची बाजू घेतली आहे, तसेच चुकीचं काही बोलेलो नाही. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही, सकाळी आमच्या विरोधात तक्रार झाल्याचे समजले आहे. योग्यवेळ आल्यावर त्यावर बोलेन असं नितेश राणे (nitesh rane) यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. तसेच महाविकास आघाडीसरकारला दाऊदचा इतका पुळका आहे तर त्यांनी दाऊदला महाराष्ट्र भूषण देऊन टाका. त्याचबरोबर आम्ही काहीही चुकीचं बोललेलो नाही अनिल देशमुख (anil deshmukh) हिंदु असल्याने त्यांचा राजीनामा घेतला मग नवाब मलिक (nawab malik) मुस्लिम असल्याने त्याचा राजीनामा घेतला नाही का ? असा सवाल आम्ही उपस्थित केला. आम्ही हिंदू मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, तसेच दोन्ही समाजात तेढ निर्माण व्हावं अशी आमची इच्छा देखील नाही.योग्य वेळी आम्ही योग्य उत्तर देऊ असं नितेश राणेंनी सांगितलं