नागपूर : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या (corona patient) वाढत आहे. या परिस्थितीला सामोरे जावं लागेल. निर्बंधाची आवश्यकताच पडू नये यासाठी लोकांनी काळजी घ्यावी. स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. पुढची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेण्यात येईल. शाळा महाविद्यालये सुरू होतात. पावसाला सुरुवात होईल. म्हणून संसर्ग वाढू नये (infection should not increase) याची काळजी घेणारे नियम करावे लागू नये, यासाठी प्रयत्न करावे. मात्र वाढ झाली तर राज्य सरकार यावर निर्णय घेईल. कोरोना रुग्ण वाढल्यास निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील, असं मोठं विधान राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केलंय.