पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)आज देहूमध्ये (Dehu) आले होते. त्यांनी यावेळी तुकारामांच्या (Tukaram Maharaj) अभंगांचा अर्थ सांगण्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतिर्थाच्या विकासापर्यंत सर्व मुद्द्यावर भाष्य केलं. याच वेळी मोदींनी तुकारामांच्या अभंगाचे महत्व सजावून सांगताना सावरकरांनीही जेलमध्ये बेड्यांची ‘चिपळी’ केली, स्वातंत्र्यांच्या लढाईत सावरकरांंना जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेव्हा ते जेलमध्ये तुकारामांचे अभंग वाचायचे असे म्हणत गौरवपूर्ण उल्लेख सावरकरांचा केला होता. तसेच मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचाही गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात तुकारामांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. म्हणत आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडघडणीतील संतांचे योगदान समजावून सांगितलं आहे. तर यावेळी मोदींनी तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचा अर्थ समजावून शांगताना समानतेचा आणि एकतेचा दाखलाही दिला आहे.