AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 आमदार बरखास्त झाले तर नांदेड अन् लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार, आणखी एका बड्या नेत्याचं वक्तव्य!

काँग्रेसमधील नितीमत्ता संपली आहे. दहापिढ्या बसून खातात इतकं त्यांच्याकडे आहे, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

16 आमदार बरखास्त झाले तर नांदेड अन् लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार, आणखी एका बड्या नेत्याचं वक्तव्य!
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 05, 2022 | 4:45 PM
Share

राजीव गिरी, नांदेडः सध्याच्या सरकारमधले १६ आमदार अपात्र ठरले तर नांदेडकर अन् लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसायला तयार आहेत, असं मोठं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.  राज्यात शिंदे-भाजप सरकारचं काम वेगाने सुरु असतानाच अचानक सरकार पडण्या आणि पाडण्याची वक्तव्य सुरु आहेत. मुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात (Supreme court) प्रलंबित आहे. सरकारवर टांगती तलवार तर आहेच. त्यातच अनेक बडे नेते शिंदे गटातील आमदार बरखास्त झाले तर काय होऊ शकतं, याबद्दल शक्यता वर्तवत आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपचा प्लॅन बी सांगितला तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबंडेकर (Prakash Ambedkar) यांनीदेखील मोठं वक्तव्य केलंय.

नांदेडमध्ये सुरु असलेल्या धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते. या सभेत त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून मोठी टीका केली. काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर त्यांनी नेमकं बोट ठेवलं. राहुल गांधींचा उपक्रम चांगलाय, मात्र यातून फार काही हाती लागेल, अशी शक्यता कमी असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

राज्यातील शिंदे सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यापैकी 16 आमदार बरखास्त झाले तर देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन बी तयार असल्याची चर्चा आहे. हाच धागा पकडत ते म्हणाले, 16 आमदार बरखास्त झाले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत….

नांदेडचे काँग्रेसमधील बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जाण्याच्या चर्चा अनेकदा येत असतात. यातूनच प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलंय. शिंदे गट अपात्र ठरला तर देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसच्या 22 आमदारांच्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलंय. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले, ‘ काँग्रेस वाले म्हणतायत, आमचं काय शिल्लक राहिलंय? त्यामुळे जे वाचलंय, ते वाचवण्यात ते हित पाहत आहेत, काँग्रेसमधील नितीमत्ता संपली आहे. दहापिढ्या बसून खातात इतकं त्यांच्याकडे आहे, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत, मात्र त्यांच्याकडे मुद्दाच नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. हे सामान्यांचं सरकार नाही. हे लुटारुंचं सरकार आहे, राहुल गांधींनी हे मांडायला शिकलं पाहिजे. हा चालणारा खेळखंडोबा काँग्रेस वाले मांडू शकत नाहीत कारण तेही यात एकेकाळी सहभागी होते. देशात खाजगीकरण काँग्रेसच्या काळात सुरू झालं…

आज इथला कापसाचा शेतकरी डोळे लावून बसलाय की मागच्या सारखा भाव मिळेल.. पण मिळणार नाही. जाणता राजा दवाखान्यात आहे, कापसाला 12 हजारांचा भाव मिळायला हवा, कापूस आयात बंद केलं तर कापूस बारा हजार क्विंटल वर जाईल , शेतकरी संघटना बोलणार नाहीत कारण त्यांनी एकेकाळी गॅट करार त्यानी स्वीकाराला…

शेतकरी जातीला महत्व देतो शेतीला दिला असता तर अशोक चव्हाण निवडून आले नसते, इथला शेतकरी जागृत असता तर जातीच्या उमेदवाराला महत्व दिले नसतं तर उसाला भाव देणाऱ्याला निवडून दिलं असतं, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं..

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?