मुंबई : राज्यात कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसतेय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी हाच मुद्दा घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. नियम फक्त सामान्य जनतेलाच असतात का असा सवाल त्यांनी केला आहे. सर्वांनीच कोरोना नियम पाळले पाहिजेत. शिवसेनेचा एक मेळावा पाहिला होता. तिथे कोणी मास्क लावले नव्हते. नियम पायदळी तुडवण्यात आले. नियम तंतोतंत पाळले पाहिजेत, असे दरेकर म्हणाले.