बारामतीमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने बळीराज सुखवला असून, पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. तसेच या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. बारामती परिसरात जोरदार पाऊस झाल्याचे पहायला मिळाले.