भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सल्ला दिलाय. नाना पटोले यांनी खरंतर आपल्या पक्षातून लोक बाहेर जाणार नाही याची काळजी करण्याची आवश्यकता आहे, असं विखे पाटील म्हणालेत. आगामी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकांपर्यंत हा अहमदनगर जिल्हा शत-प्रतिशत भाजपमय होईल यात आम्हाला शंका नाही, असा विश्वाही विखे पाटलांनी व्यक्त केलाय.