Raju Shetti on Farmer | भोंग्याच्या प्रश्नांपेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न अधिक महत्त्वाचे

| Updated on: May 16, 2022 | 8:53 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे पुण्यात आले असता बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना, राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष द्यायाला सरकारला वेळ नाही मात्र सत्तेत असणारे आणि विरोधात असणारे इतर प्रश्नावर चर्चा करतात ही दुर्दैवाची बाब असल्याचे म्हटले आहे.

Follow us on

पुणे : सध्या देशभरात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa), मशिद भोंग्यावरुन वाद सुरु आहे. याच मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या आपल्या बीकेसीच्या सभेत तोफ डागली होती. त्यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetty) यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राला भोंगा मंदिरावर वाजतो की मशीदीवर हे महत्वाचे वाटत नाही. तर महाराष्ट्राच्या ग्रामिण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शेती पिकाला भाव मिळत नाही, पाण्यासाठी वणवन फिरावं लागतं हे महत्वाचं आहे. तर मराठवाड्यात उभा ऊस आहे तसाच आहे. उसाला तोड मिळत नाही म्हणून शेतकरीआत्महत्या करत आहे. परंतु सत्तेत असणारे आणि विरोधात असणारे इतर प्रश्नावर चर्चा करतात ही दुर्दैवाची बाब असल्याचे म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारला (Mahavikas Aghadi government) टोला लगावला आहे.